
गेल्या आठवडय़ापासून मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागत असल्याने मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. एरव्ही दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण चिंतेचा विषय असते. यंदा पावसामुळे फटाके कमी फुटले आणि प्रदूषण सामान्य पातळीवर राहिले आहे. रविवारी मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ म्हणून नोंद झाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ऍपवरील नोंदीनुसार, शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 53 अंकांवर होता. तसेच भायखळा येथे 38, कुलाब्यात 34, घाटकोपरमध्ये 46, कांदिवली-31, भांडुप-43, माझगाव- 42, मालाड- 44, पवई- 46, शिवडी- 42, वरळी-44 आणि शीव येथे 39 इतका हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली.



























































