नेरूळमध्ये लटकली पावसाळ्यापूर्वीची कामे, शिवसैनिकांची विभाग कार्यालयावर धडक

पावसाळा सुरू झाला असला तरी नेरूळ परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे अद्यापही लटकली आहेत. नाले आणि गटरांची साफसफाई व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात अनेक भागांत पाणी साचले. याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयावर धडक दिली आणि विभाग अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. पालिका फक्त ठरावीक प्रभागांमध्येच विकासकामांचा पाऊस पाडत आहे. विकासकामांतील या भेदभावामुळे नेरुळ विभागात पावसाळ्यापूर्वीची कामे लटकली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई संपर्कप्रमुख एम. के. मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी गुरुवारी नेरुळ विभाग कार्यालयावर धडक दिली.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, मनोज इसवे, उपजिल्हा संघटक उषा रेणके, वसुदा सावंत, उपशहरप्रमुख सतीश रामाणे, शिवाजी महाडिक, अॅड. कौस्तुभमोरे, विभागप्रमुख तानाजी जाधाव, बाबू तळेकर, लक्ष्मण पोपळघट, दीपक परब, हरिश इंगवले, श्रीकांत भोईर, सुचिता धुरी, राजेश पुजारी, राकेश महाऊलकर, शीतल गुंजाळ, किर्ती सुर्वे, डॉ. सुनील सावंत, बाळकृष्ण जाधव, प्रकाश कळगुटकर, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.