
टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू पियुष चावला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 रोजी जिंकलेल्या टी20 आणि 2011 रोजी जिंकलेल्या वन डे विश्वचषक संघाचा तो भाग होता. 13 वर्षांपूर्वी तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
पियुष चावला टीम इंडियाकडून 3 टेस्ट, 25 वन डे आणि 7 टी20 सामने खेळला. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 7, वन डे मध्ये 32 आणि टी20 मध्ये 4 विकेट्सची नोंद आहे. त्याने IPL मध्येही दमदार खेळाचे दर्शन घडवले. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये त्याने 192 लढतीत 192 विकेट्स मिळवल्या आहेत. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूत त्याचा तिसरा नंबर लागतो.