पाकिस्तानला हिंदुस्थानात दंगली घडवायच्या होत्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चिनाब पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कटरा येथे 42 मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दुर्दैवाने आपल्या शेजारील देश मानवताविरोधी आहे. गोरगरिबांच्या उपजिविकेविरोधात आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये जे घडले, ते याचेच उदाहरण आहे. पाकिस्तानने मानवता आणि काश्मीरचा सांस्कृतिक ठेवा यावर घाव घातला. त्यांचा हेतू हिंदुस्थानात दंगली घडवायचा होता. काश्मीरच्या कष्टाळू लोकांची कमाई रोखण्याचा कूट हेतू होता. त्यामुळेच पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.