राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला

देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाला सामान्य नागरिकांचे हित जपणारी अर्थव्यवस्था हवी आहे, मोजक्या धनदांडग्यांसाठी राबणारी नको, असे नमूद करतानाच राजकारण करा पण इव्हेंट मॅनेंजमेंट नको, असा सणसणीत टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.

‘आकडे खरं बोलतात’ असे शीर्षक देत राहुल गांधी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी आकडेवारीच्या माध्यमातून वस्तुस्थितीच समोर ठेवली. गेल्या वर्षी दुचाकाRच्या विक्रीत 17 टक्के आणि कारच्या विक्रीत 8.6 टक्के घट झाली आहे. मोबाईल बाजारात 7 टक्के घट झाली आहे. दुसरीकडे, खर्च आणि कर्जे दोन्ही सतत वाढत आहेत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

एका वर्षात टू व्हीलरची विक्री 17 टक्क्यांनी घटली आणि चार चाकी वाहनांच्या खरेदीत 8.6 टक्क्यांची घट झाली. इतकेच नव्हे तर मोबाईल पह्नचे मार्पेटही 7 टक्क्यांनी घसरले.

सगळंच महागतंय

घरभाडे, घरगुती महागाई, शिक्षण खर्च, जवळजवळ सर्वकाही महाग होत आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्येक सामान्य भारतीय ज्या आर्थिक दबावाखाली आहे त्याचे वास्तव आहे. म्हणूनच आपल्याला असे राजकारण हवे आहे जे झगमगाटाशी नाही तर सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील वास्तवाशी जोडलेले असेल. वस्तुस्थिती समजून घेणारे, जबाबदारीने त्याला प्रतिसाद देणारे असेल, असे राहुल म्हणाले.

फक्त मित्रांचा विकास

काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण पोस्ट करत मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. शेतकरी आणि बेरोजगार मृत्यूला कवटाळत आहेत. महागाईने सामान्य जनतेचे पंबरडे मोडले आहे. असे असताना मोदी सरकार मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रीमतांच्या विकासाची गॅरंटी देत आहे. केवळ मोदी मोदी नारे देऊन गरिबांचा विकास होणार नाही, असे खर्गे यांनी सुनावले.