
उत्तर प्रदेशमध्ये बकरी ईदला मुस्लिमांना गायींची कत्तल करू देणार नाही आणि जर मुस्लिमांनी बंदी असलेल्या प्राण्यांची कत्तल केली तर मुस्लिमांचीही कत्तल केली जाईल आणि कुशीनगरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, अशी उघड धमकी भाजपचे मंत्री राजेश्वर सिंह यांनी दिली आहे. सिंह यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
मुस्लिमांचा बकरी ईद सण उद्या शनिवार, 7 जून रोजी देशभरात साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कुशीनगर जिह्यात बोलताना मंत्री राजेश्वर सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया की, बंदी असलेल्या कोणत्याही प्राण्याची कत्तल केली जाणार नाही.
बंदी असलेला प्राणी म्हणचे गाय. आपल्याला तिचे रक्षण करावे लागेल. त्यामुळे आम्ही गाय, वासरू किंवा उंट अशा कोणत्याही प्राण्याची शिकार करू देणार नाही. जर बंदी असलेल्या प्राण्यांची कत्तल केली तर कुशीनगरमध्ये रक्ताचे पाट वाहतील.