
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, तेच होईल, आता संदेश देणार नाही, थेट बातमीच देणार, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आता याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यावर त्याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी राज्याच्या राजकारणावर मत व्यक्त करत फसव्या योजना आणून मते विकत घेणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल. आपण संदेश देणार नाही, थेट बातमीच देऊ, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्यावर त्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, महाराष्ट्र म्हणजे भाजप नाही. तो उपऱ्यांचा पक्ष आहे. त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्राची अस्मिता, 106 हुतात्मे यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. ते व्यापारी आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्रच्या अस्मितेवर ठआम आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या जे मनात आहे, तेच आमच्याही मनात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष मतभेद विसरून एकत्र आले. त्यावेळी मराठी माणसाचा विजय झाला.मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला. सध्याच्या काळआत भआजपने महाराष्ट्रात असेच वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणासाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज असे मानणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
फडणवीसांना राजकारणाचे अगाध ज्ञान, ते त्यावर गीताही लिहीतील
महाराष्ट्राच्या जाज्ज्वल्य आणि अभिमानास्पद इतिहास असताना राज्याचे भविष्य आणि वर्तमान खतम करण्याचे काम असंशिं गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सर्वजण करत आहेत. फडणवीस यांचे राजकीय ज्ञान अगाध आहे. ते नवीन गीता लिहीणार आहेत. त्यांना सर्व समजते. अतर सर्वजण मूर्ख आहेत, असे ते समजतात. आम्ही त्यांच्या आधीपासून राजकारणात आहोत. आम्हालाही राजकारण समजते. आम्ही मोदी, शहा यांच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झालो नाही. कोणाच्या मेहरबानीने मुख्यमंत्रीपद मिळवणे म्हणजे राजकारण समजते, असे होत नाही, असा जबरदस्त टोलाही संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
बाल संगोपन योजनेला निधी नसल्याने अनाथ मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात येत आहे. याबाबत असंशिं, फडणवीस आणि अर्थमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे गरजेचे आहे. सामाजिक न्यायासाठी, गोरगरिबांसाठीच्या योजना,वृद्धांच्या योजना रद्द करून त्या सर्व योजनांचे पैसे मते विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. त्यांनी अनाथ मुलांच्या योजनेलाही सोडले नाही. आश्रमशाळा, वसतिगृहे तसेच गोरगरिबांच्या योजनांचे पैसे त्यांनी मते विकत घेण्यासाठी वळवले. पैसे नसताना ते सोंग कशासाठी घेत आहेत. ही योजना निवडणुकीसाठी होती पुढील निवडणुकीवेळी पुन्हा तीन महिन्यांसाठी आम्ही ही योजना सुरू करू, असे त्यांनी स्पष्ट करावे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.