किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार, मुंबई आणि पालघरला अतिवृष्टीचा इशारा

कोकण ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पालघर आणि मुंबईत अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, उत्तर कोकणपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण भागात, विशेषतः पालघर, मुंबई आणि आसपासच्या परिसरात पश्चिमेकडील वाऱ्यांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे या भागात पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
तसेच IMD-BFS मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार पुढील २४ तासांत अतिवृष्टीचे सत्र होण्याची शक्यता आहे.IMD च्या अपडेट्स पाहत रहा आणि सुरक्षित राहा असे आवाहन होसाळीकर यांनी केले आहे.