
आंध्र प्रदेशातील खासगी कंपनीतील कर्मचाऱयांना आता दिवसभरात कमीत कमी 10 तास काम करावे लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने नुकताच कामगार कायद्यात बदल केला असून याला कायदेशीर मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने हा बदल केला आहे. कामाचे तास वाढवण्यासोबतच ओव्हरटाईम आणि रात्रपाळीच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार, महिलांना रात्री 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु महिलांना रात्रीपाळीत कामावर बोलवायचे की नाही हा निर्णय कंपन्यांवर सोपवला आहे. तसेच ओव्हरटाईमची मर्यादा आता 75 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचाच अर्थ कर्मचाऱयांना आता 144 तास ओव्हरटाईम केल्यानंतरच अतिरिक्त वेतन दिले जाणार आहे.