
एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी झालेल्या 270 जणांपैकी 119 जणांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मृत व्यक्ती व कुटुंबीयांच्या डीएनए नमुन्यांची जुळवाजुळव करुन मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. सोमवारी चौथ्या दिवसाअखेर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह 76 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवार सायंकाळी किंवा बुधवारी सकाळपर्यंत सर्व मृतांची ओळख पटवली जाईल, असा अंदाज एका पोलीस अधिकाऱयाने व्यक्त केला. दरम्यान, विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजच्या अतुल्यम वसतिगृहातील तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत वसतिगृहातील एकूण आठ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे.
विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर सोमवारी राजकोट येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. घरापासून अंत्यसंस्कार स्थळापर्यंत सहा किलोमीटर अंतरावर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पुष्पहार अर्पण करून विजय रुपाणी यांना श्रद्धांजली वाहिली.