
एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमधील मेघानी भागात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना टाटा ग्रृपकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान या अपघातात आपले वडील गमावलेल्या एका महिलेने यावरून एअर इंडिया प्रशासनाला फैलावर घेतले आहे. ”तुम्ही काय एक कोटी देता. मी तुम्हाला 2 कोटी देते. माझे वडील मला परत आणून द्या”, असे त्या महिलेने एअर इंडियाला सुनावले आहे. फाल्गुनी असे त्या महिलेचे नाव आहे.
”तुम्ही विमान चेक करायला हवं होतं का नाही तपासलं. मस्करी बनवून ठेवलीय का एअर इंडिया वाल्यांनी. पैशाने तुम्ही सगळं विकत घेऊ शकता पण माझे वडिल आणून देऊ शकता का? पैशाने झोपण्यासाठी पलंग विकत घेता येईल पण त्या पलंगावर झोप कशी येईल. पैशाने खरं प्रेम विकत घेता येईल का जे प्रेम माझे वडील माझे वडील माझ्यावर करत होते. देशप्रेमी होते माझे वडील म्हणून एअऱ इंडियाने जायचे. काय मिळालं त्यांना? असा सवाल फाल्गुनी यांनी केला आहे.