अंगावरचे कपडे घ्या,पण कर्जमाफी द्या! बच्चू कडूंचा सलग चौथ्या दिवशी अन्नत्याग

अमरावती – शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहिले. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून मनोज जरांगे यांनीदेखील बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला वर्ध्यामदील शेतकऱयांनी पाठिंबा देत आर्वी तहसील कार्यालयात ‘अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी द्या’, असे आंदोलन केले.