
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 पर्यटकांना मारलं होतं. आता हिंदुस्थानी सैन्याने याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता यावरच चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 8 मे रोजी सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधी पक्षांना माहिती दिली जाईल आणि पुढची रणनीती काय असेल याबाबत सांगितले जाईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पुस्तकालय भवनातील समिती कक्षा जी074 मध्ये होईल असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानी सैन्याने रात्री 1.44 वाजता पाकिस्तानच्या 9 ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची अनेक तळ उद्ध्वस करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला म्हणून हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे.
Govt has called an All Party leaders meeting at 11 am on 8th May, 2025 at Committee Room: G-074, in the Parliament Library Building, Parliament Complex in New Delhi. https://t.co/1hcBepMReC
— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 7, 2025