
मुंबईचा राजा म्हणून ख्याती मिळवलेल्या रोहित शर्माने 50 चेंडूंमध्ये 81 धावांची वादळी सलामी देत संघाला धुवाँधार सुरुवात करुन दिली. त्याला विस्फोट बेअरस्टोची (47) साथ मिळाली. त्यामुळे मुंबईने गुजरातला जिंकण्यासाठी 228 धावा करत 229 धावांच आव्हान दिल होता. आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिल अवघ्या 1 या धावसंख्येवर बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता. परंतु जबरदस्त फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनने एका बाजून खिंड लढवत 49 चेंडूंमध्ये 80 धावा चोपून काढल्या. तो बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुदर्शनने (48) मधल्या फळीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु इतर फलंदाज बाद होत गेल्यामुळे गुजरातला 208 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं आणि मुंबईने 20 धावांनी सामना खिशात घातला. अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मुंबई आता पंजाबला भिडणार आहे.