
सांघित कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या आयपीएल सिजनची अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीने 10 षटकं राखून पंजाब किंग्जचा दारूण पराभव केला.
सेमी फायनलमध्ये पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. पंजाबने बंगळुरूला अवघ्या 102 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते लक्ष्य बंगळुरूने दोन गडी गमावत अवघ्या दहा षटकात गाठलं.