
भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या आठ जणांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारने दुचाकीसह रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांनाही धडक दिली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कारचालकालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
उत्तर प्रदेशातील आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातानंतर जमावाने कार चालकाला बेदम चोपले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि चालकाला ताब्यात घेतले. चालकाची वैद्यकीय तपासणी करत आहेत. गंभीर जखमींवर एसएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.



























































