
दलितांसाठी राखीव 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांत एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकली. वरून स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली, म्हणजे ही एक लूट आहे आणि नंतर कायदेशीर सूट. म्हणजे ‘मतचोरी’ करून स्थापन झालेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’ आहे यावर मोदी गप्प का, असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत चढवला. त्यांना माहिती आहे की, कितीही लुटलं तरी मतचोरी करून पुन्हा ते सत्तेत परतणार आहेत. त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे, ना लोकांची, ना दलितांच्या हक्कांची. मोदीजी, तुम्ही यावर गप्प का आहात? कारण तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवरच टिकलं आहे’, असा टोला राहुल यांनी लगावला.





























































