
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘ग्रामोद्योग भरती पुरस्कार’ वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी राजभवन येथे होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. रक्षा वागे (ठाणे), संदेश दळवी (रत्नागिरी), दर्शन यादव (धुळे) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर चार उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य खादी मंडळाचे सभापती रवींद्र साठे, डॉ. पी. अनबलगन, दीपेंद्र सिंह कुशवाह, गीतांजली बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.