
कसोटी क्रिकेटमधील ‘रोहितपर्व’ संपले आणि टीम इंडियाची धुरा युवा खेळाडू शुभमन गिल याच्या खांद्यावर आली. बीसीसीआयने मोठ्या आशेने त्याच्याकडे हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व सोपवले. त्याच्याच नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. पाच फलंदाजांनी शतक ठोकूनही हिंदुस्थानला सामना गमवावा लागल्याने गिलच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. परंतु, हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री गिलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका हरली तरी संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलवर कर्णधार म्हणून विश्वास ठेवला पाहिजे, असे स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. एका पराभवामुळे कर्णधाराच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. गिलला कर्णधार म्हणून स्थिरावण्यासाठी आणि संघाचा समतोल साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा, असेही ते म्हणाले.
अनुभवाने शुभमन गिल याच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. त्याला किमान तीन वर्ष कर्णधारपदावर राहू द्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा निकाल काहीही लागला तरी, बदल करू नका. किमान तीन वर्ष त्याला सोबत ठेवा, तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, असेही शास्त्री म्हणाले.
एजबॅस्टनवर दिसणार बुमराचा दरारा? हिंदुस्थानी व्यवस्थापन बुमराची विश्रांती पुढे ढकलण्याच्या विचारात
गिल खूप परिपक्व झालेला आहे. पत्रकार परिषदेमध्ये तो ज्या पद्धतीने उत्तरे देतो आणि नाणेफेकीवेळी बोलते त्यावरून तो खूप परिपक्व झाल्याचे दिसते. गिलमध्ये यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व घटक असल्याचे शास्त्री म्हणाले. तो अनुभवाने शिकला आणि परिस्थितीशी जुळवून घेऊ शकला तर जागतिक क्रिकेटच्या पटलावर त्याचेच नाव गाजताना दिसेल, असेही ते म्हणाले.
अहमदाबाद अन् मेलबर्न स्टेडियमही सर्वोत्तम, डब्ल्यूटीसी फायनलसाठी अन्य देशांचाही विचार व्हावा