साहित्य जगत – साहित्याने भारलेला

>> रविप्रकाश कुलकर्णी

सुख आणि दुःखभोग कुणाला चुकले आहेत? किंबहुना ‘आयुष्य’ नावाच्या एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत, पण सुख कापरासारखे उडून जाते. दुःख मात्र आयुष्यभर रुतून राहते. जे ज्याचे त्यालाच कळत असते. माणसे अशाने उन्मळून पडतात किंवा हे दुःख आयुष्यभर कुरवाळत राहतात. पण काही जणांचे अहोभाग्य इतके असते की, त्यांना वेळीच कशाचा तरी आधार मिळून त्यांचे आयुष्य सफळ होते. साहित्य अभ्यासक वामन देशपांडे यांचे 10 जून 2025 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन झाले. केवळ आणि केवळ साहित्य आधाराने त्यांनी आपले प्रदीर्घ आयुष्य सुसह्य केले. वामन देशपांडे यांची साहित्य असोशी इतकी होती की मुंबईतील मराठी सांस्कृतिक जगतातील ते जणू अविभाज्य भाग होते. मग ते कविता वाचन असेल, पुस्तक प्रकाशन असेल, अशा ठिकाणी त्यांची उपस्थिती नाही असे क्वचितच होत असेल.

त्याचीच पुची पायरी म्हणजे निरनिराळ्या मासिकांतून, साप्ताहिकांतून, दैनिकांतून त्या-त्या संबंधात लेखन अटळ असे. संबंधित संपादकांना तर वामन देशपांडे हा मोठा हक्काचा माणूस वाटत असे. याचे कारण आयत्या वेळीदेखील माहिती वा त्या संबंधित लेख देणारा हा भरवशाचा माणूस होता. त्या काळात वामन म्हणजे उत्साहाने फसफसलेला जिंदादिल माणूस होता. मूळचा गिरगावकर असलेला पोटापाण्यासाठी म्हणून आधी चक्क महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कारखान्यात ट्रेंड अॅप्रेंटिस म्हणून काम करू लागला, पण साहित्यात जीव अडकलेल्या वामनचा त्या नट-बोल्ट-स्पॅनर घिसाडी कामात कुचंबणा व्हायला लागली. याच काळात सुदैवाने त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या मान आणि प्रतिष्ठा असलेल्या ठिकाणी नोकरी लागली.

त्याचे दगदग पर्व संपले आणि तो सुखासीन आयुष्यात प्रस्थापित झाला. कामापेक्षाही साहित्यिक चर्चा, गप्पा, व्याख्याने, लेखन यात रममाण झाला. बँकेनेदेखील जणू त्याला त्यासाठी मोकळा ठेवला. बँकेशेजारीच एशियाटिक सोसायटी. तेथे दुर्गाबाई भागवत त्या काळात जणू तळ ठोकावा अशा बसत असत. त्यांच्या भोवती चंद्रकांत खोत, जया दडकर, अशोक शहाणे, पु‘नवी क्षितिज’चे संपादक झालेले विश्वास पाटील यांचा गराडा पडलेला असे. त्यात वामन देशपांडे यांची भर पडली. या वळणावरच त्याला बॉम्बे सेंट्रल येथे असलेल्या क्वार्टर्समध्ये जागा मिळाली आणि मधल्या काळात गिरगाव सोडून बोरिवलीला स्थलांतर केलेल्या वामनला माहेरघरी आल्यासारखे झाले. मग काय विचारता, वामनचा सगळा वेळ साहित्य, संस्कृती, संगीत यातच जाऊ लागला. त्याच्या घरी अड्डे जमू लागले. शशी मेहताचे काव्यवाचन असो वा व. पु. काळे यांचा कथाकथनाचा कार्यक्रम असो ते थेट लोणावळ्यात खंडेपारकर यांच्या बंगल्यात त्यांच्या वाच्या निमित्ताने होणारी मैफल असो, त्यात वामन देशपांडे असणे गरजेचे होऊन बसले. विशेष म्हणजे येथे पुलंच्या सखाराम गटणेच्या उत्साहात तो काम करत असे.

याच्या जोडीला एकदा त्याने प्रकाशनाचा व्यापदेखील करून पाहिला. त्याच्यापुढे आदर्श मौज प्रकाशनाचा होता. मुलाच्या नावाने वाल्मीक प्रकाशन त्याने सुरू केले. ‘अमृत’चे संपादक, ‘मौजे’चे सुप्रसिद्ध लेखक मनोहर शहाणे यांचा ‘ससे’ कथासंग्रह कात्याने प्रकाशनाची मुहूर्तमेकेली. आजचे नामांकित लेखक भारत सासणे यांचे पहिले पुस्तक ‘कॅम्प’ आणि ‘बाबीचे दुःख’ वाल्मीक प्रकाशनने काआहे. पुनाटककार म्हणून गाजलेल्या प्र.ल. मयेकर यांचा ‘मसीहा’ नावाचा लक्षणीय कथासंग्रह, अरविंद गोखले यांचा कथाविषयक लेखांचा संग्रह वाल्मीकचा आहे. एरवी सभा-संमेलने असल्या गोष्टीपासून कटाक्षाने दूर राहिलेले गोखले या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते ते केवळ वामनसाठी! अशा प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून त्याची चोखंदळ दृष्टी दिसते, पण हा सगळा अव्यापारेषु उद्योग ठरला. कारण प्रकाशन व्यवसायाचे छक्केपंजे त्याच्या गावालाही माहीत नव्हते.

अखेरीस पंचवीस पुस्तके कावाल्मीक प्रकाशनाची इतिश्री झाली आणि गठ्ठेच्या गठ्ठे असलेली पुस्तके पुतो डोंबिवलीला आला तेव्हा तेथे घेऊन आला खरा, पण अतिवर्षामुळे त्याच्या घरात पाणी शिरले आणि सगळ्या पुस्तकांचा लगदा झाला. वाल्मीक प्रकाशनचे एकही पुस्तक दाखवायलाही त्याच्याकडे शिल्लक राहिले नाही.

वामनच्या बाबतीत अपूर्व गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतर तो डोंबिवलीत आला आणि इथल्या म.सा.प. शाखेचा अध्यक्ष झाला! तसेच त्याचे लेखन संतविषयक झाले. इतके की, त्याची संख्या शंभराच्या वर झाली असेल. त्याच्या व्याख्याने आणि प्रवचनांमुळे अनेकांनी त्याला चक्क गुरुपद दिले.  ही कमाई सोपी नाही. असे सगळे असूनसुद्धा वामन यांनी माझ्याशी ठेवलेले मैत्र कायम होते. वयोपरत्वे आमचा हा मित्र लेखक गेला असला तरी त्याच्या आठवणी कायमच राहतील.