IPL 2025 Final – फायनलमध्ये पावसाने धुडगूस घातला तर काय होणार? कोणता संघ होणार चॅम्पियन? वाचा…

आयपीएलच्या इतर हंगामांच्या तुलनेत IPL 2025 विशेष असणार आहे. कारण यंदा आयपीएलची ट्रॉफी नवीन संघ उंचावणार आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आतापर्यंत एकदाही विजतेपद पटकावू शकेलेल नाहीत. सध्याच्या घडीला दोन्हीही संघ फॉर्मात आहेत. क्वालिफायर 2 मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईला पंजाबने पराभवाचा धक्का दिला आणि फायनलमध्ये धडक दिली. तसेच बंगळुरूने क्वालिफायर 1 मध्ये पंजाबचा पराभव करत थेट फायनलचे तिकीट मिळवले. दोन्ही संघ विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच पावसाने धुडगूस घातला तर पूर्ण समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट असून जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर, अतिरिक्त 120 मिनिटांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. परंतु याही वेळेत सामना होऊ शकला नाही तर, गुरुवारी म्हणजेज 4 तारखेला सामना खेळवला जाईल. म्हणजेच गुरुवार हा फायनलच्या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. राखीव दिवशीसुद्धा खेळ होऊ शकला नाही तर, जो संघ गुणतालिकेत आघाडीवर असेल त्या संघाला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच पंजाबचा संघ IPL 2025 चा चॅम्पियन होईल. पंजाबने 14 सामन्यांमध्ये 9 सामने जिंकले असून 19 गुणांची कमाई केली आहे. तसेच बंगळुरूनेही 14 सामन्यांपैकी 9 सामने जिंकून 19 गुणांची कमाई केली आहे. परंतु नेट रनरेटच्या हिशोबाने पंजाब आघाडीवर आहे. त्यामुळे पावसाचा व्यत्यय पंजाबला चॅम्पियन बनवणारा ठरू शकतो.

सनरायझर्स हैदराबादचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट