
”हिंदू संस्कृती अमर आहे, जर हिंदू संस्कृती नष्ट झाली तर संपूर्ण जग नष्ट होईल, असे मोठे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे एका सभेत बोलताना केले आहे. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच सरसंघचालक मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत.
”जगातील सर्व देशांनी सर्व प्रकारची परिस्थिती बघितली आहे. ग्रीसमध्ये युआन, इजिप्तची मिस्र, रोमची एक वेगळी संस्कृती होती. या संस्कृती नष्ट झाल्या आहेत मात्र हिंदू संस्कृती टिकून आहे. आपल्या संस्कृती काहीतरी नक्की आहे जे आपण अजुनही टिकून आहोत”, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू संस्कृतीचे कौतुक केले.
”भारत हे एका अशा सभ्यतेचे संस्कृतीचे नाव आहे जी अमर आहे. आपण आपल्या समाजात एक असं बंधन तयार केलं आहे की ज्यामुळे हिंदू समाज हे कायम इथे राहणार. जर हिंदु नष्ट झाले तर हे जग नष्ट होईल”, असे देखील ते म्हणाले.
गेल्या अडीच वर्षापासून मणिपूर धगधगत आहे. कुकी आणि मैतेई समाजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांनी स्थलांतर केले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असून या हिसांचारानंतर प्रथमच मोहन भागवत तेथे दौऱ्यावर आले आहेत.




























































