
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.
रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजींनी 50 वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात त्यांनी सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली. त्यांनी दैनिक सामनात सलग 16 वर्षे विविध लेखमाला लिहल्या.