
अहमदाब येथे गुरुवारी एअर इंडियाचे ड्रिमलायनर विमान कोसळून तब्बल 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला तर विमान जिथे कोसळले त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील व आजुबाजूच्या 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे प्रमुख यांनी प्रतिक्रिया देत दुख व्यक्त केलं आहे.
”नीता आणि मी तसेच संपूर्ण रिलायन्स कुटुंब अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुखी आणि वेदनेत आहोत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना आम्ही मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या काळात, रिलायन्स मदत आणि बचाव कार्यासाठी पूर्णपणे आणि ठामपणे पाठीशी उभी आहे आणि शक्य त्या प्रत्येक प्रकारे मदतीसाठी तयार आहे. या अपरिमित दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती आणि धैर्य सर्वांना मिळो, हीच प्रार्थना. ॐ शांती.”, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.