Air India Plane Crash – नैतिकतेच्या आधारावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा – सुब्रमण्यम स्वामी

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दरम्यान या दुर्घटनेवरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला आहे.

”1950 साली जेव्हा एका रेल्वे अपघातानंतर तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा दिला पाहिजे”, असे स्वामी यांनी ट्विट केले आहे.