
सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारात व्यस्त असताना दिशाभूल करण्यासाठी महायुतीचे नेते मात्र पंढरपूरच्या आषाढी वारीत नक्षलवादी घुसल्याचे सांगून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा असलेल्या आषाढी वारीला बदनाम करत आहे. सरकारच्या या षडयंत्राचा महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहेत. सत्ताधारी वारी सारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या अपमानकारक जुलमशाही विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी आमदारांनी हातात संविधानाचे पुस्तक धरून सरकारवर निशाणा साधला.
घोटाळे बाज सरकारचा धिक्कार असो…शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी…वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो…मंत्रोच्चार करून सोयाबीनचे पीक वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.