
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वरळीतील जांबोरी मैदान येथे सलग दहाव्या वर्षी गणपती विसर्जनासाठी 8 कृत्रिम तलावांचे भूमिपूजन करण्यात आले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस आकर्षिका पाटील यांच्या प्रयत्नाने आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या वतीने कृत्रिम तलावांचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुनील शिंदे, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख जिवबा केसरकर, शाखा संघटक अनिता नायर, शाखा समन्वयक संतोष जाधव, अनिल पन्नाड, समाजसेवक बाळा खोपडे, मोहन म्हामुणकर, शैलेश सिंह आदी उपस्थित होते.





























































