IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार साथ? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता

मुबंई इंडियन्सने आयपीएलच्या सतराव्या हंगामाची निराशाजनक सुरुवात केली आहे. कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिल्यामुळे चाहते सुद्धा नाराज आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये पराभव आणि कर्णधार हार्दिकने घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे चहुबाजूंनी मुंबई इंडियन्सवर टीका केली जात आहे. या सर्व घटनांमुळे रोहित शर्मासुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा रोहित शर्माचा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका वृत्तवाहिनीला मुंबईच्या एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकने आतापर्यंत ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले आहे त्यावर रोहित शर्मा अजिबात खूश नाही. त्यामुळे आयपीएलचा हा हंगाम संपल्यानंतर रोहित मुंबईची साथ सोडू शकतो. तसेच रोहित आणि हार्दिकमध्ये काही मुद्यांवरून मतभेद आहेत. त्यामुळे ड्रेसिंग रुममधले वातावरण सुद्धा नकारात्मक आहे, अशी माहिती मिळत आहे.