शेतकऱ्यांना हमीभाव, तरुणांना नोकऱ्या हव्या, पण या देशात ऐकतो कोण? राहुल गांधी यांचा हल्ला

शेतकऱयांना किमान हमीभाव हवा आहे, तरुणांना नोकऱया हव्या आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, पण या देशात त्यांचे ऐकतो कोण, असा जबरदस्त हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चढवला.

आज देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी, महागाईचा प्रश्न अशी दारुण परिस्थिती आहे. कुणालाही विचारा, पण सरकारमधील कुणाला वेळ कुठे आहे? ही निवडणूक मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गातील गरीबांचं भवितव्य ठरवणारी आहे. देशाची घटना, लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.