मटणावरून राडा; वरपक्षाने मोडले लग्न

जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना घडली. पोलिसांनी वरपक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

मुलगी निजामाबादमधील राहणारी तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलीच्या घरी साखरपुडा झाला. पण काही दिवसानंतर लग्नाच्या पंक्तीत मटणाची नळी नसल्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांचे जोरदार भांडण झाले. वधू आणि वर मंडळींचा वाद इतका वाढला की पोलिसांना बोलवावे लागले. पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही. वादाची परिणिती मुलीचे लग्न मोडण्यात झाली.