
आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी मुंबईहून ‘डॉक्टर दिंडी’ रवाना झाली आहे. दादर येथील स्वामी समर्थ मठातून विठ्ठलाच्या चरणी लीन होत आणि हरिनामाचा जयघोष करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या अनोख्या दिंडीमध्ये मुंबईतील विविध नामांकित रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पंढरीच्या वाटेवर ऊन, पाऊस आणि थकव्याची तमा न बाळगत पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना वाटेत मोफत औषधोपचार, प्रथमोपचार आणि आवश्यक आरोग्यसेवा देणे, हा या दिंडीचा मुख्य उद्देश आहे. भक्ती आणि सेवेचा हा अनोखा संगम या डॉक्टर दिंडीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळत आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)






























































