
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील अनागोंदी व विद्यार्थी मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, सेंट्रल किचन बंद करावे, गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना प्रत्येकी एक कोटी रुपये, जखमी विद्यार्थिनींना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने मंगळवारी, 1 सप्टेंबर रोजी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवनावर विराट उलगुलान मोर्चा काढण्यात आला.
छाया: भूषण पाटील




























































