अमेठीतील भाजपाच्या खासदार स्मृती इराणी यांनी आपल्या मतदारसंघात केलेली कोणतीही पाच कामे सांगावीत, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. येथून या वेळी निवडून येणे एनडीएसाठी अत्यंत कठीण असणार आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवत्ते अभय दुबे यांनी म्हटले आहे. स्मृती इराणी या घाबरलेल्या दिसत असून जर त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे केली असतील तर त्यांना भीती कशाची, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेठीत काँग्रेसने अनेक विकासकामे केल्याचे दुबे यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसने अमेठीत कारखाने आणि रुग्णालये उभारली. तर स्मृती इराणी ज्या विकास कामांचा उल्लेख करत आहेत ते केवळ दोन खोल्यांचे काम असून तिथे विजेचे कनेक्शनही देण्यात आलेले नाही, असा हल्लाही दुबे यांनी चढवला.