भाजपच्या जातीयवादी धोरणाने जनता त्रस्त, बसपा अध्यक्षा मायावती यांचा आरोप

mayawati-new

देशात मोठय़ा प्रमाणात महागाई वाढली, गरिबी, बेरोजगारी, द्वेषपूर्ण राजकारण आणि देशातील परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. भाजपच्या जातीयवादी धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी बुधवारी केला.

मायावती यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, प्रभारी यांच्यासोबत बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. जातीयवादी धोरणामुळे भाजपचा जनाधार कमी झाला असून यापुढेही तो कमी होत जाणार आहे. बसपा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नाही, असेही मायावती म्हणाल्या.