शिवाजीनगर, साईचरण सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

चेंबूरमधील शिवाजीनगर, वाशी नाका आणि साईचरण सोसायटी येथे वर्षभरापासून असलेली पाण्याची समस्या आता सुटणार आहे. विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटिका पद्मावती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 147 मधील पाण्याच्या पाईपलाईनचे काम माजी शिक्षण समिती अध्यक्ष व माजी नगरसेविका अंजली नाईक यांच्या अथक प्रयत्नांमुळे सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

चेंबूरमधील शिवाजीनगर, वाशी नाका आणि साईचरण सोसायटी येथील रहिवाशांना गेले वर्षभरापासून पाण्याची समस्या होती. पाण्याची समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे, हे पालिका अधिकाऱ्यांनाही कळत नव्हते. त्यामुळे नाईक यांनी पालिकेच्या माध्यमातून आर. सी. मार्ग ते शिवाजीनगरच्या डी सेक्टरपर्यंत नवीन पाण्याची लाईन टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा शुभारंभही केला. यावेळी अणुशक्तीनगर विधानसभा युवासेना समन्वयक अमोल कोकरे, रहिवासी जरीना, लीना, मंगल जोग, रोहिणी, वैशाली पेंडकर, महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.