जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषा योग्य नव्हती, मान्य आहे पण पंतप्रधानांनी हीच गोष्ट त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही सांगावी. त्यांच्या ट्रोल टीमने जे पेरलं तेच त्यांच्या अंगावर आलं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तुमच्या आईला बोलल्यावर तुम्हाला जसं वाईट वाटलं, तशी इतरांनाही आई असते. तुम्ही म्हणता मुलांना माफ केलं, इतक्या वर्षात तुमच्या पक्षाने जे केले त्याची माफी कोण मागणार? लाठी चालवली त्याचा आदेश देणारे माफी कधी मागणार? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.




























































