राज्यपालांकडून विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी

महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपालांकडून 12 आमदार नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेची सुनावणी आज मंगळवार 16 जानेवारी रोजी मुख्य न्यायाधीश मुंबई यांच्या समोर ठेवण्यात आली आहे.

31 जुलै 23रोजीच्या आदेशाप्रमाणे गव्हर्नर ऑफिस व महाराष्ट्र राज्य यांनी प्रतिज्ञापत्र दिनांक 19 सप्टेंबर 23 रोजी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. तसेच यावर याचिका करता सुनील मोदी यांनीही रि जॉइंडर 4 ऑक्टोबर 23 रोजी दाखल केले आहे.

आज होणाऱ्या सुनावणीमध्ये सदर याचिका युक्तिवादींसाठी तारीख निश्चित करण्यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) शहर प्रमुख सुनील मोदी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.