विकासाच्या गप्पा मारणाऱया केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. मोदींनी देश विकून देश चालवला, त्याला विकास म्हणायचे का? गब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मूठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. विदर्भातील पाचही जागा महाविकास आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास पटोले यांनी आज व्यक्त केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिह्यातील सुकळी या गावी आज कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोदी सरकारने शेतकरी, तरुण, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. मोदी सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड संताप असून तो प्रचारावेळी दिसून आला, असे पटोले म्हणाले.
देश स्कतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीकर ताठ मानेने क किकासाची किकिध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे काताकरण असते तर एकढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी क भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्कत्र निराशाच दिसते. 10 कर्षे सत्ता असताना किकासकामे न केल्याने काँग्रेसला शिक्या देणे, प्रभूरामाच्या क धर्माच्या नाकाकर मते मागण्याचा केकिलकाणा प्रयत्न मोदी करत आहेत, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले आहे.