
मध्य रेल्वेच्या ताफ्यात उभी असलेली वातानुकूलित लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान ती चालवली जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर तिच्या 12 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. सध्या धावत असलेल्या सर्वसाधारण लोकल फेऱया रद्द करून त्या जागी एसी लोकल फेऱया सुरू करण्यात येणार आहेत.


























































