
देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. अन्नधान्याच्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आखातात वाढणाऱ्या संघर्षामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत तेल पडणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार मे महिन्यातील 3.93 टक्क्यांवरून जूनमध्ये किरकोळ महागाई ४.३८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
सोमवारी सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली आहे. ती मे महिन्यातील ३.९३ टक्क्यांवरून जूनमध्ये ४.३८ टक्क्यांपर्यंत वाढली. ही वाढ प्रामुख्याने वाढत्या अन्नधान्याच्या किमतींमुळे झाली आहे. ही माहिती सोमवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीतून उघड झाली आहे.
जूनमधील किरकोळ महागाई वाढीचे मुख्य कारण वाढत्या अन्नधान्याच्या किमती आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित अन्नधान्य महागाई जूनमध्ये ५.३२ टक्क्यांवर पोहोचली, जी मे महिन्यात नोंदवलेल्या ४.७८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अन्नधान्याच्या किमतींमधील सततची वाढ ग्राहकांसाठी चिंतेचे कारण बनली आहे.
आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित अन्नधान्य महागाईचा दर जूनमध्ये ५.३२ टक्के होता, जो मे महिन्यातील ४.७८ टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे. मुख्य महागाई दर (हेडलाइन इन्फ्लेशन) ४ टक्के (अधिक किंवा उणे २ टक्क्यांच्या मर्यादेसह) राखण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर सोपवली आहे. अन्नधान्याच्या महागाईतील वाढीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेवर महागाई नियंत्रणात ठेवण्याचा दबाव वाढू शकतो.
किरकोळ महागाईतील वाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. वाढत्या अन्नधान्याच्या किमतींचा घरगुती बजेटवर परिणाम होतो. कडधान्ये, भाज्या आणि इतर जीवनावश्यक खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. यामुळे दैनंदिन खर्च वाढेल. ग्राहकांना त्यांच्या खरेदीच्या सवयींमध्ये बदल करावा लागू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.



























































