22 वर्षानंतरही सरकारी आश्वासनं कागदावरच; शहीद जवानाच्या 80 वर्षीय आईची शौर्य चक्र परत करण्याची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले शौर्य चक्र विजेते आणि माजी सहाय्यक कमांडंट विवेक सक्सेना यांच्या 80 वर्षीय आईने शासनाने दिलेले सर्व सन्मान आणि पदके परत करण्याची तयारी दर्शवली आहे. 22 वर्षांनंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

8 जानेवारी 2003 रोजी विवेक सक्सेना शहीद झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या कुटुंबाला स्मारक उद्यान आणि ग्रामीण कोट्यातून जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. 22 वर्षे उलटूनही हे आश्वासन कागदावरच राहिले आहे. विवेक सक्सेना यांची आई सावित्री सक्सेना आणि त्यांचा मोठा मुलगा रणजीत यांनी लखनऊ येथील जनता दरबारात हा मुद्दा मांडला. मुलाच्या बलिदानानंतर जाहीर झालेल्या सवलती आणि जमिनीसाठी गेल्या दोन दशकांपासून अधिकाऱ्यांकडून अत्यंत असंवेदनशील वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बातमी अपडेट होत आहे…