
गणपती उत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून 9 सप्टेंबरपासून 262 गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या 262 गणपती विशेष गाड्यांमध्ये 200 आरक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 62 अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवल्या जातील. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणात गाड्या धावतील.
या 200 आरक्षित विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी 112 ये-जा करणाऱ्या गाड्या, रत्नागिरीसाठी 64 गाड्या आणि मडगावसाठी 24 गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,682 प्रवाशांनी या गाड्यांमध्ये आरक्षण केले आहे. अनारक्षित डब्यांची तिकिटे UTS प्रणालीद्वारे सामान्य दरात बुक करता येतील. प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना केवळ वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आणि वैध ओळखपत्र सोबत बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

























































