सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना घाबरवलं जातय, शरद पवारांचा भाजप सरकारवर निशाणा

सत्तेचा गैरवापर होत आहे हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. अनिल देशमुख किंवा संजय राऊत असतील यांना तुरुंगात टाकण्यात आलं होत. मात्र त्यांना ज्या कारणासाठी तुरुंगात टाकलं होतं त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं न्यायदेवतेने जमीन देताना सांगितलं आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून लोकप्रतिनिधींना घाबरवून सोडण्याचं काम भाजप सरकार करत आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शनिवारी ते बारामती येथे बोलत होते.

केंद्र सरकारचा चुकीचा दृष्टिकोन न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण देशासमोर उघड झाला आहे. त्यामुळे यातून त्यांनी शहाणपणा शिकवा अशी अपेक्षा आहे. असेही मत पवार यांनी व्यक्त केले आहे.