नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री सम्राट याना फटकारले, बिहार सरकार कोसळणार; तेजप्रताप यादव यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनशक्ती जनता दलचे (जेजेडी) राष्ट्रीय अध्यक्ष तेजप्रताप यादव यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बिहारमधील सरकार लवकरच कोसळणार असल्याचे तेजप्रताप यांनी म्हटले आहे. बांकीपूरचे भाजप उमेदवार अभिषेक सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तेजप्रताप यांनी हा दावा केला आहे.

शुक्रवारी तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “बिहारमध्ये खूप लवकर सरकार कोसळणार आहे, आणि नितीश कुमार यांनी सम्राट म्हणत मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते, भविष्यवाणी केली होती. मी आता वृंदावनमध्ये आहे, खूप लवकर बिहारमधील सध्याचे सरकार बदलेल.”