मराठी माणसाचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरचे प्रेम भाजपला बघवत नाही, सुप्रिया सुळे यांची टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले आणि देशभरात दबदबा निर्माण केला. देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने या दोन्ही नेत्यांना भरभरून प्रेम दिले, पण त्यांची ही ताकद आणि हे प्रेम भाजपला बघवत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपवर टीका केली. बाळासाहेब आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचवली. त्याचप्रमाणे शरद पवार यांनीही राष्ट्रवादीची स्थापना करून देशभरात पोहोचवण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करून लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ऋणात आहोत’ अशी कृतज्ञताही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर असे नमूद केले की, ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करून, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले, पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱया भाजपने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठय़ा कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले.’

भाजप महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करतो!
‘महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपने घातला आहे. त्यासाठी पेंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय. महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, मात्र या तत्त्वशून्य पह्डापह्डीतून राज्याची प्रतिमा मलिन करण्याचे पाप भाजप करत आहे,’ असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.