महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवेल! कन्हैया कुमार यांचा भाजपवर हल्ला

शूरवीरांच्या आणि क्रांतिकारी विचारांच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्र मराठी माणसांना गृहीत धरण्याचे काम केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार करत असून येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातला मराठी माणूस दिल्लीकरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्ला काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी आज केला. कन्हैया कुमार हे रविवारी मुंबईत आले होते. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.