निमित्त – कर्करोगावर ‘नवा मसाला’

>> मंजिरी फडके

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारांसाठी हिंदुस्थानी मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे. सन 2028 पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  हिंदुस्थानी मसाल्यापासून तयार केलेल्या नॅनोमेडिसिनमध्ये फुप्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉइड पेशींच्या विरुद्ध कर्करोगविरोधी कृती दिसून आली आहे. त्याच वेळी सामान्य पेशींसाठी ते सुरक्षित असल्याचेही दिसून आले आहे, असे सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानी मसाल्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे यापूर्वीही अनेक अभ्यासकांनी मांडले होते; पण आता आयआयटीच्या संशोधकांनी पेटंट घेतल्यास त्याला वैज्ञानिक अधिमान्यता मिळणार आहे.

गभरात वैद्यकीय उपचार प्रणालींच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणावर संशोधने सुरू असूनही आणि त्याला विज्ञान तंत्रज्ञानाची साथ लाभूनही अनेक दुर्धर व्याधींवरील रामबाण औषध शोधण्यामध्ये आपल्याला यश आलेले नाही. चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीने विषाणूजन्य आजारांची चर्चा मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यावेळी अँटिव्हायरल औषधांची निर्मिती करण्यातील मर्यादा लक्षात आल्या. तथापि, अशा आजारांचा मुकाबला करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि त्या काळानुसार विकसित होत आहेत. अलीकडील काळात जगभरामध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार या प्रमुख व्याधींनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे.

?काही वर्षांपूर्वीपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना कर्करोग होताना पाहायला मिळायचे. त्यामुळे या व्यसनांपासून लांब राहिल्यास कर्करोगाला दूर ठेवता येईल अशी धारणा होती, परंतु गेल्या दशकभरात अशा प्रकारच्या कोणत्याही व्यसनांचा गंधही नसलेल्या असंख्य जणांना केवळ कर्करोगाने गाठलेच नाही, तर अनेकांचा बळीही गेला आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या मते, आजघडीला जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांपुढे या व्याधीने तगडे आव्हान उभे केले आहे. कोणत्याही प्रकारच्या आजारावर औषध तयार करताना शास्त्रज्ञांना अपरिमित प्रयत्न करावे लागतात. त्याच्या विविध स्तरांवर चाचण्या घ्याव्या लागतात. मुळात विशिष्ट व्याधीवर विशिष्ट घटक प्रभावी ठरेल हे शोधणेच कठीण काम असते. यासाठी प्राचीन आरोग्यशास्त्राचा आधार घेतला जातो.  यातील प्रत्येक गोष्टीला शास्त्राrय आधार आहे असे नाही, परंतु परंपरागत चालत आलेल्या ज्ञानातून आणि अनुभवातून या आहार घटकांची उपयुक्तता सिद्ध झाल्याचे दिसून आले आहे.

?हिंदुस्थानात हजारो वर्षांपासून आयुर्वेद, युनानी किंवा अनेक भागांतील जमाती, समाज घटकांतील पारंपरिक पद्धतीत हळदीप्रमाणेच अनेक वनौषधी, अन्नधान्यांचा वापर विविध आजारांवर केला जातो, पण त्याविषयी आजही मोठय़ा प्रमाणावर अनभिज्ञता आहे. वैद्यक शास्त्रातील संशोधनामध्येही याबाबत फारसे मोलाचे काम केले जात नाही. या पार्श्वभूमीवर अलीकडेच समोर आलेली एक बातमी महत्त्वाची आहे. त्यानुसार इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), चेन्नई येथील संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारांसाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट घेतले आहे.  हिंदुस्थानी मसाल्यापासून तयार केलेल्या नॅनोमेडिसिनमध्ये संशोधकांना फुप्फुस, स्तन, आतडे, ग्रीवा, तोंड आणि थायरॉइड पेशींच्या विरुद्ध कर्करोगविरोधी कृती दिसून आली आहे.

यासंदर्भात आयआयटी-मद्रास येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन यांनी दिलेली माहिती मोलाची आहे. त्यानुसार हिंदुस्थानी मसाल्याच्या तेलांचे औषधी फायदे शतकानुशतके ज्ञात असले तरी त्यांच्या जैव उपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला आहे. कर्करोगाच्या पेशींशी सािढय घटक आणि त्यांच्या परस्पर संवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी यांत्रिकी अभ्यास महत्त्वाचा असून तो आम्ही प्रयोगशाळांमध्ये सुरू ठेवू. त्याच वेळी समांतर पद्धतीने आम्ही प्राण्यांच्या अभ्यासातील सकारात्मक परिणामांना क्लिनिकल चाचण्यांमध्ये त्वरित परावर्तित करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ते सांगतात. तसेच आम्ही दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत हे औषध बाजारात आणण्याचा विचार करत आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या संशोधनाचे महत्त्व म्हणजे पारंपरिक कर्करोग उपचार पद्धतीपेक्षा नॅनो ऑन्कोलॉजीचे फायदे अधिक आहेतच; पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचे दुष्परिणाम नाहीत. या संशोधन कार्यामध्ये सहभागी असणाऱ्यांच्या मते, पेटंट केलेले हिंदुस्थानी मसाले आधारित नॅनो-फॉर्म्युलेशन औषध अभ्यासांद्वारे कर्करोगाच्या अनेक सामान्य प्रकारांमध्ये प्रभावी सिद्ध झाले आहे.

हिंदुस्थानी पारंपरिक आहार, त्यासाठी वापरले जाणारे पदार्थ यांचे आरोग्यशास्त्राrय महत्त्व कालातीत आहे. अलीकडील काळात त्यांच्या औषधी गुणांविषयी विविध संशोधनांमधून आणि अभ्यासातून माहिती उजागर होऊ लागली आहे. अर्थात यासंदर्भातील पुढील संशोधनाचे टप्पे आणि पेटंट मिळवण्याची प्रािढया पार पडणे आवश्यक आहे. कारण त्याखेरीज हे औषध खुल्या बाजारात आणण्याची परवानगी मिळणार नाही. हळदीचा लढा असो किंवा आयआयटी चेन्नईच्या संशोधकांना मिळालेले यश असो, त्यातून पुन पुन्हा पारंपरिक हिंदुस्थानी आहार पद्धतीचे अनन्यसाधारण महत्त्व समोर येत आहे.