ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Veteran actress Bhairavi Vaidya passes away at 67) यांचे निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. 45 वर्षांच्या कारकिर्दीतीत त्यांनी ऐश्वर्या राय, सलमान खान यासह अनेक कलाकारांसोबत चित्रपटात काम केले. यासह हिंदी आणि गुजराती मालिकेमध्ये त्या झळकल्या होत्या.
गेल्या काही काळापासून भैरवी वैद्य कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि 8 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजराती सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि ‘स्कॅम 1992’ वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रतिक गांधी याने भैरवी वैद्य यांच्या आठवणींला उजाळा दिला.
मला त्यांच्यासोबत व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये मोठा पडदा शेअर करण्याची संधी मिळाली. आमच्यातील बॉन्डिंग मस्त होते. त्या खुपच प्रेमळ होत्या. मी बालपणी त्यांना थेअटर आणि टीव्हीवर काम करताना पाहिले होते. त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटाचये. त्यांना हसरा चेहरा मी कधीही विसरू शकत नाही, असे प्रतीक गांधी म्हणाला.
View this post on Instagram
दरम्यान, भैरवी वैद्य यांनी ऐश्वर्या रायसोबत ‘ताल’, तर सलमान खानसोबत ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात काम केले होते. यासह त्या ‘हमराज’ आणि ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटातही दिसल्या होत्या.