मोदी जेवढय़ा जास्त सभा घेतील, तेवढा विरोधकांना लाभ 

निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱया टप्पात मतदान कमी झाल्याचा फटका विरोधकांना न बसता भाजपला बसणार असून नरेंद्र मोदींच्या राज्यातील सभांचा भाजपला फायदा होणार नाही. उलट राज्यात मोदी जेवढय़ा जास्त सभा घेतील तेवढा लाभ विरोधकांना होणार आहे, अशी टीका वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुण्यात पत्रकारांशी आज संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले. 2024मध्ये नवीन तरुणांनी भाजपला मते दिली होती. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. जे कमी मतदान झालेले आहे, ते भाजपचे आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत. यंदा राज्यातील निकाल घासून लागणार आहेत. जो कुणी जिंकेल तो 25 हजारांच्या फरकाने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.