महाराष्ट्र हा भटक्या आत्म्याची शिकार! मोदींचे अंधश्रद्धाळू वक्तव्य

फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे

देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार पाडापाडीच्या राजकारणात भाजप हिरीरीने सहभागी होऊन खेळी करताना आतापर्यंत देशाने पाहिले आहे. मात्र, आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय टीका करताना, महाराष्ट्राबद्दल खदखदरुपी अंधश्रद्धा व्यक्त केली. महाराष्ट्र हा भटक्या आत्म्याची शिकार झाल्याचे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले ‘जय भवानी, जय शिवाजी’

शिवसेनेच्या मशाल गीतातून हिंदू धर्म आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ हे शब्द वगळण्याचे निवडणूक आयोगाने फर्मान काढले आहे. मात्र, आजच्या पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि त्यापाठोपाठ ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणा दिली.